रत्नागिरी
टाळेबंदीमुळे हापूस आंब्या विक्रीचा मोठा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहीला होत़ा केकणातील बहुतांश बागायतदार हापूस विक्रीसाठी बाजारसमित्यांवरच अवलंबून आहेत़ मात्र कोरोनाच्या प्रादुभावामुळे बाजारसमित्यांचे कामदेखील ठप्प झाले होत़ त्यामुळे बागायतदारांचा हापूस विक्रीसाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा लिलाव प्रक्रिया सुरु केली होत़ी आतापर्यंत 3 हजार 747 डझन म्हणजेच 11 हजार 541 मेट्रीक टन आंब्याचा लिलाव करुन 11 लाख 75 हजार रुपयांची उलाढाल झाली आह़े
जिल्हा उपनिबंधक ड़ा अशोक गार्डी यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती संजय आयरे, उपसभापती ड़ा अनिल जोशी यांच्या विद्यमाने लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आह़े वाशी बाजारसमितीमधील गडगडले भावामुळे शेतकऱयांचे होणारे नुकसान पाहता हि लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आह़े लिलाव केंद्र उभारल्सानंतर प्रथमच हा लिलाव होत आह़े यावर्षी कमी उत्पादन असताना देखील बागायतदरांनी आंबा लिलावासाठी बाजार समितीमध्ये आणला होत़ा
एप्रिल अखेर आंब्याचा लिलाव सुरु झाला होत़ा आतापर्यंत3 हजार 747 डझन म्हणजेच 11 हजार 541 मेट्रीक टन आंब्याचा लिलाव करुन 11 लाख 75 हजार रुपयांची उलाढाल झाली आह़े वाशी येथील बाजार समिती बंद आह़े त्यामुळे बाजार समित्याच्या लिलावर परीणाम झाला आह़े
25 हजार डझन आंब्याची ऑनलाईन विप्री
पणन मंडळाने सुरु केलेल्या ऑनलाईन आंबा विक्रीला देखील चांगला प्रतिसाद मिळत आह़े आतापर्यंत 25 हजार डझन आंब्याची ग्राहकांच्या घरपोच विक्री झाली असून केकणातील 325 हापूस आंबा उत्पादकांचा हा हापूस विकल्याची माहिती कृषी पणन मंडळाकडून सांगण्यात आली आह़े हापूस विक्रीसाठी पणन मंडळाने संकेतस्थळ चालू केले होत़े यामध्ये हापूस उत्पादकांनी नाव, संपर्क क्रमांक, कोणत्या जातीचा आंबा उपलब्ध आहे आदी तपशील भरायचा आह़े त्यानुसार मुंबई, पुणे येथील ग्राहक किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थाना हापूसची मागणी नेंदवली त्यानुसार ग्राहकांना घरपोच आंबा विक्री करण्यात येत होत़ा त्यानुसार 25 हजार डझन आंब्याची विक्री झाली आह़े