वळीव, मान्सूनपूर्व पावसाचा बागायत शेतीलाही अधिक फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
वळीव आणि मान्सूनपूर्व पावसाने जिल्हय़ातील बागायत आणि शेती पिकांचे साधारण 11.70 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एप्रिल-मे दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. 70 लाखांहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर वीज पडून 6 जण मृत्युमुखी पडले आहेत.
जिल्हय़ातील नुकसानग्रस्त क्षेत्राला कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकाऱयांनी भेट दिल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. बेळगाव, सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, मुडलगी, खानापूर, रायबाग आदी भागातील शेतीपिकांना फटका बसला आहे. विशेषतः 72 हजार हेक्टरमधील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अथणी तालुक्मयातील द्राक्ष बागायतीला फटका बसला आहे. हातातोंडाला आलेले 315 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांचे 9.45 कोटींचे नुकसान झाले आहे. याबरोबरच चिकू, पेरू आणि आंबा बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, बेळगाव, मुडलगी, खानापूर, रायबाग आदी तालुक्मयातील 33.72 हेक्टर क्षेत्रातील 40 लाखांहून अधिक केळी बागायतदारांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच निपाणी, गोकाक, मुडलगी, रामदुर्ग येथील 11 हेक्टर क्षेत्रातील 13 लाख रुपयांचे कलिंगड पिकाचे नुकसान झाले आहे. चिकोडी, गोकाक, मुडलगी, सौंदत्ती तालुक्मयातील 6.13 हेक्टर क्षेत्रातील 49 लाख रुपयांचे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱयांची उरलीसुरली आशा येत्या खरीप हंगामावर आहे. जिल्हय़ातील एकूण 2.66 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मुडलगी येथील 266 हेक्टरमधील मका तर रामदुर्ग तालुक्मयातील 30 हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.
सर्वच पिकांना फटका
यंदा उन्हाळय़ात झालेल्या अतिपावसामुळे बागायत शेती आणि इतर सर्वच पिकांना फटका बसला आहे. अतिप्रमाणात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली आहे.
– शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक कृषी खाते, बेळगाव)
मार्च, एप्रिल, मे महिन्यात झालेला पाऊस
महिना | सरासरी पाऊस | यंदा झालेला पाऊस |
मार्च | 7 मिली मीटर | 12 मिली मीटर |
एप्रिल | 26 मिली मीटर | 65 मिली मीटर |
मे | 33 मिली मीटर | 129 मिली मीटर |