ऑनलाईन टीम/तरुण भारत
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात (Accident) झाला. बस आणि तवेरा कार यांच्यात झालेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व सर्वजण महाराष्ट्रातील होते. दरम्यान, मध्य प्रदेश मधील बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. रात्री २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघात मृतांमध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृतांचे मृतदेह झाल्लार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सर्व मृत व्यक्ती याच गावाच्या राहणाऱ्या होत्या. (Car accident involving laborers returning to Maharashtra from Madhya Pradesh; 11 deaths)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बस आणि तवेरा गाडीची धडक झाली. यामध्ये कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अपघाताबाबत माहिती देताना बैतूलचे एसपी सिमला प्रसाद म्हणाले की, महाराष्ट्रात काम करणारे मजूर सणानिमित्त आपल्या गावी गेले होते गुरुवारी रात्री मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात परतताना रात्री २ वाजता ड्रायव्हरला झोप आवरली नाही आणि ताच्या गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट बसला धडकली, हा अपघात खूपच भीषण होता, दोन मुलांसह इतर ११ जण जागीच ठार झाले. दरम्यान हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडे जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजेसाठी आपल्या घरी गेले होते आणि त्यानंतर तवेरा गाडीने घरी परतत होते.