● सातारच्या शाहूनगरात शिरकाव
● मुक्तीचा आकडा 500 पार
● 71 वर्षीय बाधिताचा मृत्यू
●01गरोदर महिला बाधित (खासगीमध्ये)
● 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी/सातारा
“सातारा जिल्हा तसा कंट्रोल मध्ये आहे” असं बोललं जातं असतानाच आता नव्याने भार वाढत आहे तो खासगी हॉस्पिटलचा. कारण, आत्ता पर्यंत कोरोना बाधित लोक सापडले ते शासनाच्या रुग्णालयातूनच सापडले आहेत. मात्र रविवारी सापडलेले दोन्ही बाधित हे सातारा शहरातील खासगी दवाखान्यात सापडले आहेत. शनिवारी 9 मुक्त झाले आहेत.
*जिल्ह्यात 10 नागरिक कोरोना बाधित तर यातील दोघांचा मृत्युपश्चात रिपोर्ट कोरोनाबाधित*
जावली तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व रविवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय महिला या 2 कोरोना बाधितांचा घरीच मृत्यू झाला असून त्यांचे रिपोर्ट मृत्यपश्चात पाझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये साताऱ्यातील शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी. जावळी तालुक्यातील गांजे येथील घरीच मृत्यू झालेला 48 वर्षीय पुरुष. फलटण येथील मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय सारीचा पुरुष, व रविवार पेठ येथील घरीच मृत्यू झालेली 70 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 738 झाली असून कोरोनातून 508 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यां एकीकडे देशभरातील कोरोना बाधितांची संख्या मनात भीती निर्माण करत असताना आता पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरत आहेत. तर महाराष्ट्रातील बाधितांची आकडेवाडी आणि कोरोनाच्या घट्ट विळख्यात सापडलेल्या पुणे, मुंबईसह कार्पोरेट शहरे विळख्यातून कधी सुटणार असा सवाल नागरिकांच्या मनात असतानाच सातारा जिल्हय़ात कोरोना मुक्ताची संख्या 500 पाचशेचा आकडा पार करून गेला आहे. ही कोरोनामुक्तांची संख्या दिलासाही देत असून आज दिवसभरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये 23 वर्षीय गरोदर महिला कोरोना बाधित आढळून आली. 71 वर्षीय पुरुषाचा क्यू पश्चात अहवाल बाधित म्हणून आला आहे. जिल्हय़ात बाधितांची एकूण संख्या 728 असली तरी त्यातील 508 कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत.
सातारा जिल्हय़ात मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोना युध्दात नागरिक भीती, दिलाशाच्या हिंदोळय़ावर झुलत आहेत. आता एकीकडे देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता कडक लॉकडॉऊनची आवश्यकता समाजमनातून व्यक्त होत असली तर सातारा जिल्हय़ात सुरु असलेला कोरोनामुक्तीचा डंका जिल्हावासियांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती घालवून टाकत आहे. जिल्हय़ातील बऱयापैकी व्यवहार सुरळीत होवू पहात असतानाच आता यापुढे सगळय़ांना कोरोनासोबत जगताना स्वतःसह समाजाची काळजी घेत वाटचाल करावी लागणार आहे.
*71 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु*
काल रात्री सातारा येथील खाजगी रुग्णालयात निमोनिया वर उपचार सुरु असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील 71 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असून उपचारा दरम्यान त्याचा स्त्राव तपासणीकरीता खाजगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेला होता त्यात तो कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबई वरून आला होता. अशी माहितीही संबंधित रुग्णालयाने दिली असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
*23 वर्षीय गरोदर महिला कोरोना बाधित*
सातारा येथील खासगी रुग्णालयातून खासगी प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविलेल्या 23 वर्षीय गरोदर महिलेचा नमुना कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयास कळविले आहे.
*9 जणांना दिला रुग्णालयातून डिस्चार्ज*
मायणी कोविड सेंटर येथील 2, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथील 3, कोविड केअर सेंटर पार्ले येथील 2, कोविड केअर सेंटर म्हसवड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 1 असे एकूण 9 जणांना दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*विविध सेंटर मधून रुग्ण मुक्त*
मायणी कोविड सेंटर* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये खटाव तालुक्यातील पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, वांझोळी येथील 52 वर्षीय पुरुष. बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथे दाखल असणाऱ्यांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गोळेवाडी येथील 36, 62 व 12 वर्षीय महिला. कोविड केअर सेंटर, पार्ले येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती. कोविड केअर सेंटर, म्हसवड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये माण तालुक्यातील दहिवडी येथील 17 वर्षीय पुरुष. ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे दाखल असणाऱ्यांमध्ये खटाव तालुक्यातील निढळ येथील 23 वर्षीय महिला.
*35 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 16, शिरवळ येथील 13 व पानमळेवाडी येथील 6 असे एकूण 35 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 728 झाली असून कोरोनातून 508 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 185 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.
*115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह*
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 89 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी 26 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे. आत्तापर्यंत जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 727 झाली असून कोरोनातून 499 बऱया झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱयांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.
*कोरोनाचे समाजावर विपरित परिणाम*
कोरोना विषाणूचा कहर सुरु झाल्यानंतर देशभरात अभूतपूर्व लॉकडाऊन करण्यात आला. यापूर्वी देशात प्लेगसह स्वाईन फ्लूपर्यंत अनेक साथींना नागरिकांनी तोंड दिले. मात्र असा लॉकडाऊन अनुभवला नव्हता. कोरोना स्थितीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटली असून तळागाळातील कामगारांपासून मोठय़ा उद्योग, व्यवसायांपर्यंत सर्वांवर त्याचा विपरित परिणाम जाणवू लागला असून त्यातून काहीजण नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत हे कोरोनापेक्षा गंभीर आहे. बेरोजगारीमुळे तसेच विविध कारणाने आता विदारक घटनांना सामोरे जावे लागत आहे.
*निराशेवर मात करण्याची शक्ती सर्वांना मिळो*
रविवारी साताऱयातील एका युवकाने बेरोजगारीच्या नैराश्यातून केलेली आत्महत्या तर मुंबईत एका अभिनेत्याने केलेली आत्महत्या या कोरोना स्थितीचा परिणाम दर्शवत आहेत.
कोरोनाच्या लढय़ात खंबीरपणे सर्वांनी सामोरे जाण्याची गरज असून आता खऱया अर्थाने समाजातील आर्थिक उन्नत गटांनी देशाला सावरण्यासाठी आर्थिक अवनत गटातील नागरिकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. कोरोना स्थितीत आलेल्या निराशेवर मात करण्यासाठी उपाय योजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून जनतेच्या मनात आशावाद जागवण्यासाठी शासनासह सर्वच नेतृत्व करणाऱया जबाबदार घटकांनी कृतीशील राहून समाज घटकांना धीर दिला पाहिजे.
*जिल्ह्यात रविवार पर्यंत*
एकूण कोरोना बाकी 727
एकूण कोरोना मुक्त 508
एकूण बळी 32
*रविवारी*
एकूण कोरोना बाधित 02
एकूण कोरोना मुक्त 09
बळी 01