तिरूपती, जळगावचा समावेशः 3 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षीत
नवी दिल्ली
भारतीय विमानतळ प्राधिकरण बोर्डाने 13 विमानतळांचे खासगीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन अंतर्गत सदरची परवानगी देण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2024 पर्यंत विमानतळांमध्ये 3660 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल, असे केंद्राने म्हटले आहे. जळगावसह तिरुपती व इतर एकंदर 13 विमानतळांचे खासगीकरण होणार आहे. यासंदर्भात बोलीसाठी सरकार सल्लागार नेमणार असल्याचे समजते. यासंदर्भात बोलीकरिता 2022 च्या सुरुवातीला सरकारकडून अर्ज मागवले जाऊ शकतात.
मोठय़ा विमानतळांसह छोटी विमानतळे खासगीकरणासाठी प्रथमच एकत्र निवडली गेली आहेत. यामध्ये मोठय़ा विमानतळांसाठी मोठय़ा कंपन्या आवड दर्शवू शकतात. पण छोटय़ा विमानतळांसाठी गुंतवणूकदार कंपन्या कसा प्रतिसाद देतील, हे पाहावे लागणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. याबाबतीत सर्वंकषपणे विचार करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पाहुया 13 विमानतळे कोणती ती….
भुवनेश्वर, इंदोर, कांग्रा, वाराणसी, रायपूर, तिरुपती, अमृतसर, जरसगुडा, जबलपूर, त्रिची, गया, जळगाव आणि कुशीनगर.