प्रतिनिधी / बेळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये सलग तीन दिवस हर घर तिरंगा कार्यक्रम मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक घर, शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीवर हे ध्वज फडकविण्यात येणार आहेत. ऑगस्ट १३ पासून १५ पर्यंत हे ध्वज फडकविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गसुचीनुसार ध्वज फडकविले जाणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. प्रत्येक संघटनेच्या इमारतीवर ध्वजरोहण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. सोशल मीडीया तसेच इतर माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. याचबरोबर बॅनर तसेच पत्रके देखील छपाई करुन वितरण करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.