वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवार सकाळ ते शनिवार सकाळ या 24 तासांच्या कालावधीत भारतात 13,216 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 113 दिवसानंतर प्रथमच नव्या रुग्णसंख्येने 13 हजारचा टप्पा ओलांडला. याच कालावधीत कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू ओढवला. आता उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.16 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचले आहे. प्रतिदिन पॉझिटिव्हीटी दर 2.73 टक्के असून फारसी चिंता नसली तरी लोकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोना पूर्ण नाहिसा होत नाही तोपर्यंत मास्कचा उपयोग आणि शक्य तितक्या प्रमाणात सामाजिक अंतर पाळण्याचा नियम पाळला गेला पाहिजे, असे सांगण्यात आले.