राज्यात बेळगाव चौथ्या स्थानी : वितरण पुन्हा सुरू करण्याची नागरिकांतून मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
विजेची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारने ‘उजाला’ या योजनेतून एलईडी बल्बचे वितरण करण्यास सुरुवात केली. बेळगाव जिल्हय़ात याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून आजवर 14 लाख 43 हजार 151 एलईडी बल्ब वितरण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यात एलईडीच्या वितरणामध्ये बेळगाव जिल्हा चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे विजेची बचत मोठय़ा प्रमाणात होत आहे.
जुन्या बल्बमुळे मोठय़ा प्रमाणात विजेचा अपव्यय होत होता. त्यामुळे केंद्र सरकारने एलईडी बल्बचे वितरण करण्यास सुरुवात केली. यालाच राज्य सरकारच्या ‘नवा प्रकाश’ (व्हसा बेळकू) या योजनेची जोड मिळाली. प्रत्येक जिल्हय़ात एक वितरक नेमून त्यांच्याद्वारे बल्बचे वितरण करण्यात आले. हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर तसेच इतर काही ठिकाणी हे बल्ब विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. प्रारंभी 9 वॅट क्षमतेच्या बल्बची किंमत 65 रुपये होती. नंतर वाढवून 70 रुपये करण्यात आली. एलईडी बल्बसोबतच टय़ुबलाईट, सिलिंग फॅन यांचेही वितरण सुरू करण्यात आले होते.
आतापर्यंत राज्यात 2 कोटी 41 लाख 12 हजार बल्बचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे प्रतिवषी 31 लाख 31 हजार मेगावॅट विजेची बचत झाली असून 1 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इतर कंपन्यांपेक्षा कमी किमतीत बल्ब मिळत असल्याने सरकारकडून मिळणाऱया बल्बला मागणी सर्वाधिक होती. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ात या योजनेला उत्तम प्रतिसाद
मिळाला.
गेल्यावर्षापासून वितरण पूर्णपणे बंद…
मागीलवषी मार्च महिन्यापासून एलईडी बल्बचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनपासून वितरण बंद असल्याने नागरिक हेस्कॉम कार्यालयात विचारणा करून पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे एलईडी बल्ब, टय़ुबलाईट व फॅनचे वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.