स्पेक्ट्रम लिलावाला येणार गती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील मोबाइलधारक जे 5 जी सेवेचा विचार करत आहेत त्यांना एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे ही सेवा याच वर्षी सुरू होणार आहे.
यावर्षी 15 ऑगस्टपासून भारतीय मोबाईलधारकांना 5 जी सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने प्रयत्न चालविला आहे. दूरसंचार विभागाने 5 जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्याच्यादृष्टीने तयारीला वेग दिला आहे. दूरसंचार विभागाने मार्चच्या आत सर्व शिफारसी सादर करण्याची विनंती ट्रायकडे केली आहे.
एकंदरच सरकारला 5 जी सेवा येत्या 15 ऑगस्टपासून देशात सुरु करायची इच्छा आहे. 700 मेगाहर्टज्, 800, 900, 1800, 2100, 2300, 2500 व 3300 ते 3670 मेगाहर्टज् बँडच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली जाईल.
इंडस टॉवर्समध्ये एअरटेलने घेतला वाटा
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने इंडस टॉवर्समध्ये वोडाफोनमधील 4.7 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला आहे. यातून उपलब्ध होणारी रक्कम वोडाफोन आयडियामध्ये गुंतवणुकीसाठी आणि मोबाईल टॉवर कंपनीचे बाकी भाडे भरण्यासाठी वापरली जाणार आहे.