टाळेबंदी 15 एप्रिल रोजी संपुष्टात येणार असल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘टीम-11’ला निर्देश दिले आहेत. कुठल्याच भागात गर्दी होऊ नये, असा निर्देश योगींनी अधिकाऱयांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील खासदारांशी चर्चा केली आहे.
राज्य सरकारने टाळेबंदी टप्पाबद्ध पद्धतीने संपुष्टात आणण्यासंबंधी तयारी चालविली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सातत्याने पावले उचलत आहेत. राज्यातील वंचित वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता सर्व मंत्री, आमदारांनी सहकार्य करावे असे आवाहन योगींनी केले आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याकरता खासदार आणि मंत्र्यांनी देखरेख करावी. तसेच टाळेबंदी संपुष्टात आल्यावर गर्दी नियंत्रित करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासंबंधी योगींनी सूचना मागविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात किती जणांना सूट दिली जावी, कुठल्या संस्थांना सूट द्यावी याची सूचना करण्यात यावी. टाळेबंदी संपुष्टात आल्यावरही प्रशासनाची परीक्षा सुरूच राहणार असल्याचे योगींनी म्हटले आहे.