काठमांडू / वृत्तसंस्था
पश्चिम नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अछाम जिह्यातील अनेक भागात भूस्खलन झाले. यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण बेपत्ता आहेत. मदतकार्य अजूनही सुरू असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. येथे संततधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुसळधार पावसानंतर रस्त्यांची दुर्दशा झाली असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथे जोरदार पाऊस कोसळत असून बऱयाच भागात पूरस्थितीही निर्माण झाली आहे.