नवी दिल्ली
कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊननंतर भारतीय अर्थव्यवस्था गतीने विकासाच्या पथावर येऊ पाहते आहे. डिसेंबरच्या 18 दिवसात विदेशी गुंतवणूकीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
विदेशी पोर्टफोलिया गुंतवणूकदारांनी डिसेंबरच्या 18 दिवसांमध्ये भारतीय बाजारात 54 हजार 980 कोटी रुपयांची गुतंवणूक केली असल्याचे समजते. विविध क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या पॅकेजमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीत रस दाखवल्याचे कळते. यात बाँडसच्या माध्यमातून 6 हजार 112 कोटी रुपये गुंतवणूक झाली असल्याचे सांगण्यात येते.