ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रीय निवडणूक आयोगाद्वारे कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही निवडणूक 19 जून ला होणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे 26 मार्च रोजी होणारी निवडणूकही रद्द करण्यात आली होती. आता ही निवडणूक 19 जून रोजी होणार असून, मतमोजणी देखील त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता केली जाणार आहे.
राज्यसभा निवडणूकीच्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार होती. पण 55 मधील 37 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता केवळ 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागा आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, गुजरात आणि मेघालय येथील आहेत.