मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन : फर्मागुडी येथे शिवजयंती साजरी
वार्ताहर / मडकई
कुळ मुंडकार यांचे प्रलंबीत असलेले न्यायालयीन खटले. 19 डीसेंबर 2021 पर्यंत पूर्णपणे निकालात काढून गरिब कुळांना न्याय मिळवून दिला जाईल. गोवा राज्याचे स्वप्न पाहताना 25 वर्षा नंतर राज्य कसे असावे याची संकल्पना व मनसुबे आतापासूनच मुख्यमंत्री या नात्याने बांधून ठेवत आहे. राज्याच्या ग्रामपातळीवर विकास साधून तळागाळातल्या सामान्य माणसाला सुख समाधान व समृध्दी प्राप्त व्हावी हीच या सरकारची मनिषा असून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हीच खरी मानवंदना आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोपाळ गणपतीच्या प्रांगणात शिवजयंती सोहळय़ाच्यावेळी फर्मागुडीत केले.
फर्मागुडीच्या अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. शासकीय पातळीवर माहिती प्रसिध्दी आणि बांदोडा पंचायत आयोजित राज्यस्तरीय शिवजयंती सोहळय़ावेळी कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, फोंडा नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, तिवरे वरगांवचे जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, माहीती व प्रसिध्दी खात्याचे संचालक सुधीर केरकर, मुबंईचे इतिहास अभ्यासक वक्ते चंद्रशेखर पाटील यांनी सर्वांनी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते गोपाळ गणपतीच्या प्रांगणात व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्माची मुहूर्तमेठ रोवताना कृषी संस्कृतीला महत्त्व दिले. तमाम मराठ मावळय़ांसाठी त्यांनी सुराज्य निर्माण केले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोवा सरकार ही त्याच दिशेने वाटचाल करीत आहे. ‘आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा’ आणि 10 कलमी कार्यक्रम राबवून तळागाळातल्या सामान्य माणसांना अत्यावश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळात आरमार, शस्त्रs, जशी स्वराज्यात निर्माण केली जात होती. त्याच धर्तिवर पंतप्रधान मोदीही आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा बनवत आहे. यापूढे कर्नाटक, महाराष्ट्र व युपी या राज्यांवर अवलंबून न राहता गोवा स्वतंत्रपणे कार्यरत राहील. हिरक महोत्सवात असलेल्या गोवा राज्याला केंद्राकडून मिळालेले रूपये 300 कोटी ग्राम पातळीवर खर्च करून जनसामान्याना आवश्यक असलेले विकास प्रकल्प राबवून समृध्द गोव्यात सुराज्य आणले जाईल, असेही पूढे बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत म्हणाले.
कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुशाग्र बुध्दीने सर्व मावळय़ांना एकत्रीत आणून स्वराज्याची निर्मिती केली व अस्मिता जागवली. स्वधर्माचे रक्षण करताना सर्वांना एकाच बरोबर घेऊन जाण्याची ताकद व सामर्थ्य त्यांच्यात होते. दुर्दैवाने आताच्या राज्यकर्त्यामध्ये ही ताकद नसल्याचे त्यांच्या एकंदर कार्यपध्दती वरून दिसून येत आहे. शिवजंयती साजरी करताना दोन गट होणे हे सुराज्यासाठी घातक असल्याचा संकेत आहे. माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे रवी नाईक यांनी यापूर्वी शिवजयंती साजरी करताना सर्वांना एकत्रीत आणून शिव विचारांची जपणुक केली होती. युवा पिढीला दिशा दिली होती. प्रत्येकाने शिवचरीत्र वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारल्यास भारद देश बलवान होण्यास वेळ लागणार नाही.
इतिहास अभ्यासक चंद्रशेखर पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू उलघडून दाखविताना इतिहास अभ्यासक चंद्रशेखर पाटील म्हणाले की, निजाम व आदीलशाहीच्या कालखंडात एकाही मराठय़ाला आमचं स्वतंत्र राज्य असावं अस वाटत नव्हतं. पण त्याच काळात मात्र जनता सुरक्षित असावी, धर्म व संस्कृतीचे रक्षण व्हावे. महाराष्ट्रात आमचही स्वतंत्र व सार्वभौमत्व राज्य असावे, असा विचार करून साडेतिनशे वर्षांपूर्वी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्याची कल्पना सत्यात उतरवली. अवघ्या पंधराव्या वर्षी म्हणजे 1645 साली तोरणा गडावर कब्जा मिळवून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले, आणि ते पहिले स्वराज्याचे संस्थापक बनले. 1680 पर्यंत अनेक किल्ले महाराजांनी स्वराज्यात जिंकून आणले. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी फत्तेखानाचा पराभव, अफझल खानाला ठार मारले, शाहीस्ते खानाची बोटे छाटली, सुरतेची लुट केली, मिर्झाराजाशी तह केला, आग्रा भेट त्यानंतर या सर्वांवर कळस म्हणजे राज्याभिषेक असा राजकीय संघर्ष केला. महाराजांनी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणताना धर्मनिरपेक्षता कशी असावी याचा आदर्श घालून दिला.
स्वागत प्रास्ताविकात माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक सुधी केरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्याचे कार्य अधोरेखीत केले. यावेळी बालभवनच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व पोवाडा सादर केला. पाहुण्यांचा परिचय पत्रकार नरेंद तारी यांनी केला. सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी तर माहीती खात्याचे सहाय्य अधिकारी रमेश नाईक यांनी आभार व्यक्त केले.