राष्ट्रीय हरित लवादाकडून कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पर्यावरणाला नुकसान पोहोचविण्याप्रकरणी पंजाब सरकारला राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मोठा झटका दिला आहे. एनजीटीने पर्यावरणाला नुकसान पोहोचविणाऱया ठोस कचऱयाची योग्य विल्हेवाट न लावल्याप्रकरणी पंजाब सरकारवर 2 हजार कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे.
मागील आठवडय़ात एनजीटीने राजस्थान सरकारला ठोस कचऱयाची योग्य विल्हेवाट न लावल्याने 3 हजार कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला होता. तर यापूर्वी एनजीटीने उत्तरप्रदेश सरकारला 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.