ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होऊन आज एक महिना झाला. महिनाभरात या मार्गावरून जवळपास 3.54 लाख वाहनांनी प्रवास केला असून, त्यापोटी 20 कोटी 02 लाखांचा टोल वसुल झाल्याची माहिती एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. महिनाभरात या महामार्गावरील वायफड टोलनाक्यावरून 50 हजार 230 वाहने, कोकमठाणवरून 43 हजार 970 वाहने, माळीवाडा 43 हजार 218, घायगाव-जांबरगाव 33 हजार 115 वाहनांनी प्रवास केला. तर सर्वात कमी 3 हजार 521 वाहनांनी वेरूळ इंटरचेंजेसवरून प्रवास केल्याचे आकडेवारी सांगते. या मार्गावरुन एकूण 3 लाख 53 हजार 283 वाहनांनी प्रवास केला. या महामार्गावर येण्यासाठी आणि मधल्या गावात जाण्यासाठी एकूण 18 इंटरचेंजेस आहेत. विशेष हे की जेवढा प्रवास तेवढाच टोल भरावा लागतो. वायफड नाक्मयावर सर्वाधिक टोलवसुली झाली आहे.
अधिक वाचा : ‘G 20’च्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3765 गुन्हेगारांची झाडाझडती
टोलवसुली पुढीलप्रमाणे :
वायफड टोलनाका 6.51 कोटी 57,964
निधोना 2.43 कोटी 9,894
कोकमठाण 2.13 कोटी 99,056
घायगाव-जांबरगाव 1.65 कोटी 69,246
कारंजा इंटरचेंज 1.39 कोटी 12,067
माळीवाडा 1.11 कोटी 83,118