खानापूरच्या 15 शेतकऱयांचा समावेश, पोलीस प्रशासनास पूर्ण रॅकेटाचा पर्दापाश करण्यात अपयक्ष
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील हळद उत्पादक शेतकऱयांच्या फसवणूक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढू होवू लागली आहे. खानापूर (ता.वाई) येथील हळद उत्पादक 15 शेतकऱयांची तब्बल 20 लाख 4 हजार रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्या दोघांना अटक करण्यात आलेली नाही. जिह्यात आतापर्यंत बऱयाच शेतकऱयांची अशा प्रकारची फसवणूक झाली असून पोलीस प्रशासनास पूर्ण रॅकेटचा पर्दापाश करण्यास अपयश आले आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रितेश राजाराम काळोखे(वय 37) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याने त्याच्या शेतात हळद लावली होती. ती हळद काढल्यानंतर घराच्या बाजूला ठेवली होती. राजकुमार रमेशचंद्र सारडा, उर्मिला राजकुमार सारडा (दोघे रा.बुधगाव, सांगली, हल्ली रा.दौलतनगर, सातारा) यांनी दि. 4 मार्च 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता 83 क्विंटल हळद घेऊन गेले. त्याची किंमत 6 लाख 84 हजार 708 रुपये एवढी झाली. त्यापैकी 1 लाख 69 हजार 708 रुपये रोख दिले. 5 लाख 15 हजार रुपये नंतर देतो असे सांगितले. तसेच गावातील त्याच्यासह 15 शेतकऱयांची 14 लाख 89 हजार 421 रुपयांची फसवणूक केली आहे. अशी सुमारे 20 लाख 4 हजार 421 रुपयांची फसवणूक केली असून याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार हे करत आहेत.
मागील तीन ते चार वषापूर्वी कोरेगाव, सातारा, जावली, वाई आदी तालुक्यातील शेतकऱयांना सदर व्यापाऱयांने अशाच प्रकारची खोटी आश्वसाने देऊन हळदीचा माल खरेदी केला होता. तीन ते चार महिन्यांचा वायदा देऊन आजपर्यंत कोणत्याही शेतकऱयाला पैसे देण्यात आले नाहीत. यामध्ये कोटय़ावधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्ता वर्तवण्यात येते आहे. पोलीस प्रशासनाकडून फक्त गुन्हे दाखल करुन घेतले जात आहेत, मात्र तपास संथगतीने चालू आहे. त्यामुळे सदर व्यापाऱयास अध्याप पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही.
विश्वास संपादन करुन फसवणूक
खानपूर गावचे हळद उत्पादक शेतकऱयांनी आपला माल विक्रीसाठी काढला. हा माल सारडा दाम्प्त्यांनी खरेदी केला. 2018 साली सुरूवातीला या खरेदी मालाची काही रक्कम शेतकऱयांना दिली. यामुळे शेतकऱयांचा विश्वास संपादन झाला. यामुळे एक एक अशा 15 शेतकऱयांनी व्यापरी सारडा यांना हळद मालाची विक्री केली. त्यानंतर काही रक्कम देऊन उर्वरित पैसे दिले नाहीत, यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱयांच्या लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल केला.