कृषी उडानमुळे कार्गो वाहतुकीला मिळणार बळ : वाहतूक वाढल्यास रोजगार निर्मितीची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावरून मागील सहा महिन्यात 20 मेट्रिक टन कार्गो वाहतूक करण्यात आली. काही तासांमध्ये बेळगावमधून मोठय़ा महानगरांपर्यंत सामान पोहोचवता येत असल्यामुळे कार्गो वाहतूक वाढली आहे. त्यातच बेळगाव विमानतळाचा समावेश कृषी उडान-2 मध्ये झाल्यामुळे कार्गो वाहतुकीला आणखी बळ मिळणार आहे. यामुळे बेळगाव परिसरात रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सांबरा विमानतळावरून सध्या स्पाईस जेट व इंडिगो या दोन विमान कंपन्या कार्गो वाहतूक करीत आहेत. बेळगावमधून सर्वाधिक वाहतूक टपालाची केली जाते. याचबरोबर उद्यमबाग येथे कारखान्यांमध्ये तयार होणारे वाहनांचे सुटे भाग, लहान मशिनरी, सोने, चांदी, एकसमधील खेळणी यांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. सोने व चांदीचे दर दररोज बदलत असल्याने विमानाने काही तासांमध्ये वाहतूक केल्यामुळे खरेदीदार व विपेत्यांनाही सोयीचे ठरत आहे.
एकावेळी 1 टन कार्गोची वाहतूक
बेळगाव ते दिल्ली दरम्यान वाहतूक करणाऱया 737 एटीआर विमानातून एकावेळी 1 टन कार्गोची वाहतूक केली जाऊ शकते. तर लहान एअरक्राफ्टमधून 400 किलोपर्यंत वाहतूक होऊ शकते. भविष्यात कार्गोची वाहतूक वाढल्यास जुन्या टर्मिनलमध्ये कार्गो शेड उभारले जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कार्गो वाहतूक वाढल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
कृषी उत्पादने वेळेत पोहोचवता येणार
कृषी उडान-2.0 अंतर्गत बेळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला. यामुळे शेतकरी, निर्यातदार यांना सवलतीच्या दरात एका शहरातून दुसऱया शहरापर्यंत कृषी उत्पादने पोहोचवता येणार आहेत. बेळगाव परिसरात उत्पादित होणारा आंबा, काजू, केळी, द्राक्षे, पेरू या फळांसह भाजीपाला, फुले यांची वाहतूक करता येणार आहे. ज्यांना वाहतूक करायची आहे, त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱयांशी संपर्क साधावा, असे विमानतळ प्रशासनाकडून कळविले आहे.
उद्योजकांशी लवकरच चर्चा करणार
बेळगाव विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकमध्ये वसल्यामुळे परिसरातून मोठय़ा प्रमाणात कार्गो वाहतूक केली जात आहे. कृषी उडानमुळे येत्या काही दिवसात कृषी उत्पादने वाहतूक करता येणार आहेत. त्यामुळे फळे, दुग्ध उत्पादने, भाजीपाला, फुले व शेतीजन्य उत्पादनांची वाहतूक केली जाणार आहे. बेळगाव परिसरातील शेतकरी, निर्यातदार, उद्यमबाग येथील उद्योजक यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
-राजेशकुमार मौय& (बेळगाव विमानतळ संचालक)