वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱयांदा विजेतेपद भारताने पटकाविले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकावर आपले दुसऱयांदा नाव कोरले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात कर्णधार धोनीच्या शानदार खेळीने असंख्य लाखो क्रिकेट शौकिनांची स्वप्ने साकार झाली.
भारताने 2 एप्रिल 2011 रोजी तब्बल 28 वर्षांनंतर दुसऱयांदा आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्या आठवणींना उजाळा लाभला. 2011 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लंकेविरूद्ध अंतिम सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कर्णधार धोनीने कुलसेकराच्या गोलंदाजीवर विजयी उत्तुंग षटकार खेचत भारताला अजिंक्यपद मिळवून दिले. प्रत्येक भारतीय क्रिकेट शौकिनांला हा क्षण आजही चांगल्याच स्मरणात असल्याचे मत भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्राrने व्यक्त केले आहे.
भारतीय संघातील अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले. सचिन आपल्या 22 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता आणि 2 एप्रिल 2011 साली आपल्या घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियमवर) त्याला या क्षणाचा आनंद उपभोगता आला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार धोनीने नाबाद 91 तर सलामीच्या गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली होती. अष्टपैलू युवराज सिंगला ‘मालिकावीर’ तर कर्णधार धोनीला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 एप्रिल 2011 हा दिवस लाखो भारतीय शौकिनांना आजही चांगल्याच स्मरणात असल्याचे रवि शास्त्राrने म्हटले आहे.