जागतिक बँकेचा इशारा : कोरोना संसर्गाचा परिणाम
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने जगात ‘महामारी’ जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. लोकांच्या आर्थिक जीवनमानावर त्याचा थेट परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्टय़ा प्रबळ असणारे व्यवसायही मंदावले. या कोरोनाच्या विळख्यानंतर मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱया मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली असून पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत गरिबांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.
2021 पर्यंत सुमारे 15 कोटी लोकांना अति गरिबीचा सामना करावा लागणार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनोत्तर काळात आपल्याला एका नव्या अर्थव्यवस्थेला स्विकारावे लागणार आहे. नव्या व्यवसायाच्या संधीदेखील शोधण्याची गरज भासणार असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यात जगभरातील कोटय़वधी लोकांना दारिद्रय़ाचा सामना करावा लागला आहे, असा अंदाज मांडण्यात आला आहे. मात्र 2021 मध्ये ही संख्या वाढून 15 कोटींवर जाण्याची धक्कादायक शक्मयता वॉशिग्टनच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांनी वर्तवली जात आहे.