द इकॉनॉमिस्टच्या अहवालात दावा – दिल्लीत 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार पारा
वृत्तसंस्था / लंडन
युरोपमधील प्रसारमाध्यम समूह द इकॉनॉमिस्टने स्वतःच्या अहवालात केलेला दावा अंगावर काटा आणणारा आहे. 2041 मध्ये उष्णतेचे चित्र भयावह असणार आहे. दिल्लीत तापमान 49.3 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचणार असून चेन्नईत उष्णतेच्या लाटेमुळे 17,642 जणांचा मृत्यू होणार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
इकॉनॉमिस्ट दरवर्षी काही संभाव्य स्थितींचे काल्पनिक चित्र मांडत असते. याच आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवाल ऐतिहासिक पुरावे, वर्तमान अनुमान आणि विज्ञानावर आधारित आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात जीवघेण्या उष्णतेला 3 आठवडे उलटून गेल्यानंतर निर्माण होणारी स्थिती यात मांडण्यात आली आहे.
दक्षिण भारतात अधिक उष्णता असणार आहे. चेन्नई शहरात सर्वात मोठे संकट राहणार आहे. रुग्णालयांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकांची गर्दी होणार आहे. चेन्नईची खरी समस्या आर्द्रता असणार आहे. उष्णता आणि हवेतील आर्दतेला वेट बल्ब टेम्परेचर म्हटले जाते.
वेट बल्ब टेम्परेचर
कोरडय़ा हवामानातील मानवी शरीराच्या 37 अंश तापमानावर लोक घामाने ओले होऊ शकतात. पण 32 अंशांच्या वेट बल्ब टेम्परेचरमध्ये शारीरिक श्रम धोक्यापेक्षा कमी नाही. अत्यंत कमी लोक 35 अंश वेट बल्ब टेम्परेचरमध्ये जिवंत राहू शकतात. चेन्नईमध्ये मागील 10 वर्षांपासून वेट बल्ब टेम्परेचर 32 अंशांहून अधिक असल्याची माहिती ओक रिज नॅशनल लेबोरेटरी टेनेसची भौतिकशास्त्रज्ञ मोतसिम अशफाक यांनी दिली आहे.
2015 मध्ये 585 मृत्यू
26 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये उष्णलाटेनंर शहरातील उष्णता कमी करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले. 2015 मध्ये शहर आणि परिसरातील भागांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे 585 जणांचा मृत्यू झाला होता. हैदराबाद महापालिकेने 2017 मध्ये शहरातील कमी उत्पन्नगटाच्या भागांमधील छत थंड ठेवण्याचा कार्यक्रम (कुल रुफ प्रोग्राम) सुरू केला. उष्णलाटेचा सर्वात भयावह मार याच भागांना बसतो. घरांच्या छतावर स्वस्त पांढऱया रंगातील पॉलिथिलील कोटींगचे शीट अंथरण्यात आले. घरांचे तापमान दोन अंशांनी कमी झाले होते.
2041 मधील काल्पनिक स्थिती
2019 मध्ये तेलंगणात कुल रुफ प्रोग्राम लागू करण्यात आला आहे. 2027 पर्यंत हैदराबादमध्ये 8 हजारांहुन इमारतींमध्ये कुल रुफ लावले जाणार असल्याचा अनुमान आहे. 2030 मध्ये शहरांमध्ये लागू ग्रामीण रोजगार योजनेच्या अंतर्गत झोपडपट्टी आणि तात्पुरत्या निवाऱयाला पांढरा रंग दिला जाणार आहे. तसेच शहरात 25 लाख रोपे लावली जाणार आहेत.