प्रतिनिधी/ बेंगलूर : शेती उत्पादनाच्या किमतीत मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गदग येथील पावडेप्पा हलिकेरी या शेतकऱ्याने बेंगलूर येथील यशवंतपूर मार्केटमध्ये २०५ किलो कांदा खरेदी केला. पण एवढे कांदे विकून सुद्धा त्यांना फक्त 8.36 रुपये मिळाले.
शेतकऱ्याने सोशल मीडियावर पावती पोस्ट केली असून इतर शेतकऱ्यांना बेंगळुरूला आपले उत्पादन न आणण्याची चेतावणी देण्यात आली आहे. 415 किलोमीटर दूर असलेल्या गावातून सुमारे 50 शेतकरी यशवंतपूर मार्केटमध्ये कांदा विकण्यासाठी आले होते. 500 रुपये प्रतिक्विंटल असा कांद्याचा भाव अचानक 200 रुपयांपर्यंत घसरलयाने ही बाब चिंताजनक आहे.