रेल्वेंना गती देण्याचा सपाटा सुरूच : प्रवासापूर्वी 10 दिवस अगोदर करता येणार आरक्षण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवाशांची मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेने ठराविक रेल्वे मार्गांसाठी आणखी 40 गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 19 जोडी विशेष (क्लोन) गाडय़ा असणार आहेत. येत्या सोमवारपासून म्हणजे 21 सप्टेंबरपासून या गाडय़ांचे कामकाज सुरू होईल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार 21 सप्टेंबरपासून धावणाऱया क्लोन गाडय़ांच्या 20 जोडय़ांपैकी बहुतेक बिहारकडे जाणार आहेत आणि तेथून परत येणार आहेत. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी रेल्वेने 80 विशेष गाडय़ा सुरू केल्या होत्या.
धावत्या गाडय़ांची बहुतेक मागणी ज्या भागांतून परप्रांतीय कामगारांना त्यांच्या रोजगारासाठी औद्योगिक शहरात परत जायचे आहे तेथून येत आहे. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली आणि दक्षिण या राज्यांचा समावेश आहे ज्यामध्ये क्लोन गाडय़ा सुरू केल्या जात आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या सर्व गाडय़ांच्या मूळ गाडय़ांमध्ये जे भाडे घेण्यात आले आहे, तेवढेच भाडे आकारले जाईल. लखनौ ते दिल्ली दरम्यान जनशताब्दी टेन धावणार आहे. या सर्व गाडय़ांमध्ये आरक्षण आणि तिकिटांचे बुकिंग गाडय़ा सुटण्यापूर्वी 10 दिवस आधी करता येणार आहे.
प्रस्तावित क्लोन गाडय़ा बिहारमधील सहरसा, राजगीर, दरभंगा, मुझफ्फरपूर, राजेंद्र नगर आणि कटिहार ते दिल्लीपर्यंत तर पाटणा ते अहमदाबाद, छापरा ते सूरत, दरभंगा ते अहमदाबाद, दानापूर ते सिकंदराबाद आणि कर्नाटकमधील बेंगळूरपर्यंत धावतील. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बनारस, बलिया आणि लखनो ते दिल्ली दरम्यान अनेक गाडय़ा धावतील व मध्य स्थानकांमधून धावतील तर अमृतसर ते जयनगर, जलपाईगुडी आणि वांदे दरम्यान क्लोन गाडय़ा धावतील. पश्चिम रेल्वे बिहार, गुजरात, दिल्ली, मुंबई, पंजाब दरम्यान 10 गाडय़ा सुरू करणार आहे.
पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत बिहार आणि दिल्ली दरम्यान 10 गाडय़ा चालवल्या जातील. या गाडय़ा बिहारमधील सहरसा, राजेंद्र नगर, राजगीर, दरभंगा आणि मुजफ्फरपूर येथे धावतील आणि तेथेच संपतील. ईशान्य सीमेवरील रेल्वेच्या अंतर्गत धावणाऱया दोन गाडय़ाही बिहारच्या आहेत.
उत्तर रेल्वे अंतर्गत 10 गाडय़ा धावतील ज्या दिल्ली आणि बिहारमधून धावतील. पश्चिम बंगाल ते दिल्ली, पंजाब ते पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश ते दिल्ली दरम्यान गाडय़ा चालवल्या जातील. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत दानापूर (बिहार) ते सिकंदराबाद दरम्यान दोन गाडय़ा धावतील. दक्षिण पश्चिम रेल्वे गोवा ते दिल्ली, कर्नाटक-बिहार आणि कर्नाटक-दिल्ली दरम्यान 6 गाडय़ा चालवणार आहे.