नवी दिल्ली
भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा कल पुन्हा गुंतवणुकीकडे वाढला आहे. ऑगस्टमध्ये 22 हजार 452 कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्या 2 आठवडय़ात करण्यात आली आहे. महागाईत नरमाई परतल्याने याचा परिणाम गुंतवणूक वाढण्यात दिसला आहे. गेल्या जुलै महिन्यात 5 हजार कोटीचीच नाममात्र गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात करण्यात आली होती. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर 6.7 टक्के राहिला होता.