वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या भातजमिनीमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या लोंढय़ाने येथील संपूर्ण पंचवीस एकर जमिनीतील भातपीक वाहून गेले आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुळगे गावाच्या शेजारून मार्कंडेय नदी वाहते. या संपूर्ण परिसरात भातपीक आहे. कसदार जमीन असल्याने भाताचे भरघोस पीक येते. मात्र, पावसाच्या अतिपाण्यामुळे शेतकरीवर्गाला फटका बसतो. मागील आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी नदीच्या एका वळणासह पात्राने दिशा बदलल्याने जवळपास 25 शेतकऱयांचे भातपीकच वाहून गेले. शेतातील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने शेतवडीत मोठय़ा चरी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
या भागातील भातपीक नदीला पूर आला की संपूर्ण पीक पाण्याखाली जाते आणि भातपिकाचे सातत्याने नुकसान होते. पुरानंतर भातरोपांची लागवड करण्यात आली. भाताचे पीक चांगले तग धरून होते. मात्र पुन्हा मार्कंडेय नदीला पूर आला. नदीच्या पात्राने या शेतवाडीतील वळणावर दिशा बदलल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये पांडुरंग पाटील, परशराम पाटील, चंद्रकांत कलखांबकर, प्रकाश कोवाडकर, पी. ओ. पाटील, बी. ओ. पाटील यासह 25 शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर जमिनीतील वाहून गेलेली माती तसेच शेतवडीत पडलेल्या चरी बुजविणे व पुन्हा भाताच्या रोपाची लागवड करणे हे आता शक्मयच नसल्याने या सर्व शेतकरीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने या शेतीचा सर्वे करून पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी व या शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.