ऑनलाईन टीम / चंदीगड :
कृषी विषयक विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याविरोधात पंजाब, हरियाणात आंदोलनाचा भडका उडाला असतानाच 25 सप्टेंबर रोजी 180 संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या आंदोलनात हरियाणातील शेतकरीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय किसान युनियन हरियाणा चे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘भारत बंद’ च्या आव्हानात आम्ही सहभागी होणार आहेत. यावेळी आम्ही सर्व बाजार, रस्ते आणि परिवहन बंद पूर्णपणे बंद ठेवणार आहोत.
उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते बी एम सिंह हे ‘भारत बंद’ चे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. जो पर्यंत शेतकरी कायदा बंद केला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांना नवीन कायदा अजिबात मान्य नाही आहे. कारण त्यांच्या कोणत्याही मागण्यांचा या कायद्यात समवेश केलेला नाही त्यामुळे हे आंदोलन केले जात आहे. मात्र, या बंद दरम्यान, रुग्णवाहिका, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.