ऑनलाईन टीम / मुंबई :
शाळांमध्ये परिपाठात संविधनाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ होतो. या परिपाठातले विषय शाळा ठरवते. या परिपाठात संविधनाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात यावं, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
परिपाठातले इतर विषय वगळून त्याऐवजी संविधनाच्या उद्देशिकेचं वाचन केले जाईल. 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. सत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी देशात संविधनाची अंमलबजावणी सुरू झाली होती. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची मूलतत्त्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.