निसर्गापासून आपण सर्वकाही घेतो. तथापि, त्याची परतफेड करण्याचे आपल्या मनातही येत नाही. जणूकाही निसर्ग आपल्या कऱहय़ात आहे, अशीच आपली समजूत असते. या समजुतीमुळेच निसर्गाची अपरिािमित हानी होत असून मानव प्रजातीच धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही, अशी स्थिती आहे.
मानवाप्रमाणे इतरही प्रजातींचा या पृथ्वीवर तितकाच अधिकार आहे, हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. जगभरात प्रामुख्याने कासवे या वृत्तीची बळी ठरत आहेत. भारतात तर यासंदर्भात भयावह स्थिती आहे. तथापि, लखनौ विद्यापीठाच्या पदवीधर अरुणिमा सिंग या कासवांच्या तारणहार म्हणून प्रसिद्ध होत आहेत.
त्यांच्या महाविद्यालयाने हाती घेतलेल्या एका प्रकल्पातून त्यांना कासव या प्रजातीची माहिती समजली. कासवांच्या विविध प्रजाती कशा नामशेष होत आहेत आणि हे असेच होत राहिले तर निर्सर्ग आणि पर्यायाने मानव यांची किती हानी होणार आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी कासवांना वाचविण्याचा ध्यास घेतला. आज 32 वर्षांच्या असणाऱया अरुणिमा यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये कासवे आणि त्यांच्या अंडय़ांची तस्करी करणाऱयांशी संघर्ष करीत 28 हजार कासवांचे प्राण वाचविण्याची, या प्राणांइतकीच बहुमोल कामगिरी केली आहे. अरुणिमा यांनी स्वतःला 2012 पासून लखनौच्या कासव बचाव युतीशी जोडून घेतले आहे. याच संस्थेच्या माध्यमातून त्या कासवांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. आज त्या भारतातील अनेक राज्यांमध्ये कासवांच्या विलुप्त होत असलेल्या प्रजातींना वाचविण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होत असून त्यांना साहाय्य करण्यासाठी आज अनेकजण पुढे येत आहेत.