सातारा / प्रतिनिधी
साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशीय सभागृहात 29 जानेवारी रोजी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी समितीचे सदस्य मंत्री, खासदार व आमदार व इतर सन्माननीय सदस्यासह जिल्ह्यातील विविध कार्यालयांचे कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यांच्याशिवाय त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीस बैठकीला प्रवेश देण्यात येणार नाही, त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आहे