अजब प्रथा, 72 तासांपर्यंत स्वच्छतागृहात जाण्यास मनाई
विवाह करणे प्रत्येक मुलामुलीचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न पूर्ण करताच तीन दिवसांसाठी बाथरुममध्ये जाण्यास बंदी घातली जात असल्याचे कळल्यावर कुठला मुलगा किंवा मुलगी विवाह करू इच्छिणार? यावरून प्रत्येकाचे मत वेगवेगळे असेल. परंतु एक जागा या अजब प्रथेचा हिस्सा आहे. तेथे विवाहानंतर तीन दिवसांपर्यंत नवदांपत्याला बाथरुममध्ये जाता येत नाही.
बोर्नियोमध्ये राहणाऱया काही आदिवासी लोकांची ही प्रथा आहे. टिडोंग समुदायामधील लोकांचा विवाह त्यांच्या संबंधित परंपरा आणि प्रथांसह होतो. वधू आणि वराला विवाहाचे विधी पूर्ण झाल्यावर 3 दिवसांपर्यंत आंघोळ किंवा लघुशंकेसाठी जाण्याचीही अनुमती नसते.
या प्रथेचे पालन केल्यास दांपत्यामधील नाते अधिक घट्ट होते असे या समुदायाचे मानणे आहे. याचमुळे नवदांपत्याला कैद्याच्या स्व्रुपात देण्याचे काम कुटुंबीयांना देण्यात येते. दोघांनीही कमीत कमी खाणे आणि पाणी पिण्याची अनुमतीमिळते. तीन दिवसांचा हा विधी पूर्ण झाल्यावर त्यांना बाथरुममध्ये जाता येते.
आरोग्याला हानिकारक
विवाहाच्या तीन दिवसांनी दोघेही स्नान करतात. 72 तासांपर्यंत नैसर्गिक विधी रोखलयास आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो असे डॉक्टरांचे सांगणे आहे. अशा स्थितीत तेथील नवदांपत्यांवर कुठली स्थिती ओढवत असेल याची कल्पना करणेही अवघड आहे. बोर्नियो बेट इंडोनेशियात असून ते आशियातील सर्वात मोटे बेट आहे.