50 वर्षांसाठी करार : जयपूर, गुवाहाटी, तिरुअनंतपुरमचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिलली
अदानी समुहाला देशातील तीन प्रमुख विमानतळांची जबाबदारी मिळाली आहे. अदानी पोर्ट आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) दरम्यान मंगळवारी करार झाला आहे. या कराराच्या अंतर्गत पुढील 50 वर्षांसाठी जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमची जबाबदारी अदानी समुहाकडे असणार आहे.
संचालनासाठी विमानतळ प्राधिकरणासोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत तीन विमानतळांची जबाबदारी मिळाली आहे. कराराच्या अंतर्गत जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमातळाचा टेकओव्हर पुढील 6 महिन्यांमध्ये होऊ शकतो. यात विमानतळाचे संचालन, व्यवस्थापन आणि विकासाची जबाबदारी आता अदानी समुहाकडे असणार आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौत अदानी आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये 6 विमानतळांसाठी अदानी समूह सर्वात मोठा बोलीदार ठरला होता. यात लखनौ, मंगळूर, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळ सामील होते. यात मंगळूर, लखनौ आणि अहमदाबाद विमानतळासंबंधी मंत्रिमंडळाने जुलैमध्येच मंजुरी दिली होती.