खानापूर पोलिसांची कारवाई : मोठय़ा प्रमाणात वाळू पकडल्याने खळबळ
प्रतिनिधी /खानापूर
मलप्रभा नदीत बेकायदा वाळू उपसा करून एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेली 30 ब्रास वाळू पोलिसांनी रविवारी रात्री जप्त केली. बैलहोंगल डीवायएसपी शिवानंद कटगी यांच्या पथकाने धाड घालून ही बेकायदा साठवून ठेवलेली वाळू जप्त केली आहे. या बेकायदा वाळूबाबत पुढील कारवाई करण्यासाठी रितसर भूगर्भ खात्याला कळविण्यात आल्याची माहिती डीवायएसपी कटगी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. इतक्मया मोठय़ा प्रमाणात वाळू पकडण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे तालुक्मयात खळबळ माजली आहे.
शहराजवळ मलप्रभा नदीत मोठय़ा प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती वरि÷ पोलीस अधिकाऱयांना मिळाली. त्याची दखल घेऊन बैलहोंगल डीवायएसपी कटगी यांच्या नेतृत्वाखाली खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे तसेच इतर वरि÷ अधिकाऱयांनी वाळू काढण्यात येत असलेल्या तसेच वाळू साठवणुकीच्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी तीस ब्रास वाळू (50 ट्रक वाळू) या ठिकाणी उपसा करून ठेवली होती. ती सर्व वाळू जप्त करण्यात आली आहे. बेकायदा उपसा केलेली वाळू दोन ठिकाणी साठवून ठेवण्यात आली आहे. सदर वाळू मंदिरासाठी उपसा केल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र ही वाळू विकण्यासाठी काढण्यात आल्याची चर्चा आहे. वाळू जेसीबीच्या साहाय्याने काढून ट्रक्टरच्या माध्यमातून वाहतूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. बेकायदा वाळू उपसानंतर जळगा बंधाऱयात पाणी अडविण्यात आल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पाणी साठवून होते. यासाठी नियोजन करून येथून मोठय़ा प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात आला असावा, अशी चर्चा आहे.