ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारमध्ये (Bihar) प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने ( unseasonal rains) अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. यात १६ जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने (lightning strike) ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. देव मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. (bihar due to storm lightning)
या घटनेत बिहारमधील एकट्या भागलपूर भागात (Bhagalpur area bihar) ७ लोकांचा वीज कोसळून मृत्यू (7 killed in lightning strike) झाला आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur bihar) ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सारणमध्ये ३, लखीसरायमध्ये ३, मुंगेरमध्ये २, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये २ तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, वातावरणातील बदलांचा सर्वात मोठा हा बिहार राज्याला सहन करावा लागतोय. दरम्यान वीज कोसळून झालेल्या ३३ मृतांमुळे आता बिहार प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसेच खराब हवामानाच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करा, खराब हवामानात घरीच रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वादळ आणि वीज पडण्याच्या घटनेमुळे पिके आणि घरांच्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देव शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. राज यसरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सक्रियपणे करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुसळधार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे.