कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने नसबंदी मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने नसबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. मागील दोन महिन्यात 367 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना त्याच ठिकाणी सोडण्यात आले आहे. मात्र नसबंदीची गती पाहता शहरात असणाऱया सर्व कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
शहरातील भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. प्रत्येक गल्लोगल्ली कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कचराकुंडीच्या परिसरात 10 ते 15 कुत्र्यांचे टोळके घुटमळत असते. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जाणाऱयांवरही हल्ला करण्याचा प्रकार होतो. शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. याकरिता नसबंदी मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन महापालिकेने निविदा काढल्या होत्या. पण विविध कारणांमुळे ही नसबंदी मोहीम रखडली होती. मात्र नसबंदीसाठी चार महिन्यांपूर्वी महापालिकेला कंत्राटदार मिळाला आहे. जुलै महिन्यापासून नसबंदीची मोहीम राबविण्यात येत आहे.
जुलै महिन्यात 187 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दररोज 10 ते 15 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. श्रीनगर येथे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्याला दोन दिवस देखरेखीखाली ठेवावे लागते. त्याकरिता केजची कमतरता भासत असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा वेग मंदावला आहे. दोन महिन्यात 367 भटक्मया कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कुत्र्यांचा उपद्रव झाल्यास महापालिकेकडे लेखी तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे दररोज विविध भागांतून लेखी तक्रारी येत आहेत. पण शस्त्रक्रिया करण्याची संख्या कमी असल्याने सर्व भागातील तक्रारींचे निरसन करताना कसरत करावी लागत आहे.
विविध भागांतून नागरिक कुत्र्यांच्या समस्यांबाबत दूरध्वनीद्वारा महापालिकेत तसेच नसबंदी करणाऱया कंत्राटदारांना संपर्क साधत आहेत. शहरातील सर्वच भागात भटक्मया कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याने सर्व कुत्र्यांचा बंदोबस्त एकाचवेळी करणे अशक्मय आहे. काही मोजक्मयाच पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्फत शस्त्रक्रिया केली जात असल्याने दररोज 10 ते 12 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्मय आहे. मात्र या गतीने शस्त्रक्रिया केल्यास संपूर्ण शहरातील शस्त्रक्रिया करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱयांची संख्या वाढवून जास्तीत जास्त कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी होत आहे.