वार्ताहर/कोगनोळी
अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावल्याने 4 एकर ऊस जळून भस्मसात झाला. ही घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्मयाजवळ सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावऊन मिळालेली अधिक माहिती अशी, सर्व्हे नंबर 652 व सर्व्हे नंबर 653 मध्ये अनिल माने, ईश्वर माने, नंदकुमार मळगे, तानाजी माने, शशिकांत माने, आनंदा माने, आण्णाप्पा माने व अर्जुन माने यांची शेती आहे. सोमवारी दुपारी अज्ञाताने उसाला आग लावली. दुपारी वारा सुटल्याने आगीने क्षणात ऊद्रावतार धारण केला. बघता-बघता 4 एकर क्षेत्रातील ऊस जळून भस्मसात झाला. आगीची घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने निपाणीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. परंतु, अग्निशमन बंब उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याने ऊस पूर्णपणे जळाला. जळीत उसाची नोंद हुपरी येथील व कागल येथील छत्रपती शाहू सहकारी कारखान्याला असल्यामुळे घटनेची माहिती शेती अधिकाऱ्यांना दिली.