कच्छ : बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी भारतीय सागरी सीमा ओलांडून आलेल्या गुजरातमध्ये आलेल्या 4 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. याचबरोबर 10 नौका जप्त करण्यात आल्या आहेत. कच्छच्या हरामी नाला क्षेत्रानजीक या चारही जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या नौकांमधून कुठलीच संशयास्पद सामग्री हस्तगत झालेली नाही. एका विशेष पथकाने सीमेवरील स्तंभ क्रमांक 1165 आणि 166 दरम्यान काही हालचाली टिपल्या होत्या. या घटनेमुळे सतर्क झालेल्या जवानांनी हरामी नालानजीक भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया 4 पाकिस्तानींना पकडले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
Previous Articleगुजरातमध्ये काँग्रेसचे सोशल इंजिनियरिंग
Next Article महाराष्ट्र अलर्ट मोडवर…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.