मुंबई
भारतामध्ये यावर्षी 40 हून अधिक कंपन्यांनी आयपीओमार्फत 70 हजार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमविली असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे चीनने मात्र 42 कंपन्यांच्या आयपीओंवर निर्बंध घातले असल्याचे समजून आले आहे. चीनमधील शांघाई आणि शेनझेन शेअर बाजारांनी 42 आयपीओना बाजारात सादर करण्यास नकार दिला आहे. गुंतवणूक बँकर्सच्या माहितीनुसार यावर्षी बाजारामध्ये शंभरहून अधिक आयपीओ सादर होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.