हिमवृष्टीचा फायदा उठविण्याचा पाकचा कट : ‘एलओसी’वर सतर्कता
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठा घुसखोरीचा डाव आखण्यात आला आहे. हिवाळी वातावरण आणि हिमवृष्टीची संधी साधत अनेक दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याचा कट पाकिस्तानकडून शिजत असल्याचे दिसत आहे. त्यानुसार सध्या ‘एलओसी’वर 400 हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या पवित्र्यात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. पाकिस्तानच्या लष्कराकडून या घुसखोरीला पाठबळ दिले जात असून ही घुसखोरी रोखण्याचे आव्हान भारताच्या सुरक्षा यंत्रणांसमोर असणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमवर्षावाला सुरुवात झाली आहे. सीमेवरच्या पर्वतांवर आणि टेकडय़ांवर बर्फ जमा झाला. प्रचंड थंडी आहे त्यामुळे सैनिकांवरही मर्यादा आल्या आहेत. त्याचा फायदा घेत हे दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्मयता आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत. तिथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. याच तळांवर हे दहशतवादी शस्त्रसज्ज असल्याचीही माहिती लष्कराने दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान ड्रोन्सच्या माध्यमातूनही भारतात पंजाब आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे.
राज्यात स्थानिक निवडणुका शांततेत पार पडल्यामुळे दिलासा व्यक्त होत असतानाच लष्कराच्या अधिकाऱयाने सगळय़ांची चिंता वाढवणारा खुलासा केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्येही 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा लष्काराकडून करण्यात आला आहे.