प्रतिनिधी /वाळपई
आषाढी एकादशी निमित्त सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा दिंडीतून सुमारे चारशे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले आहेत. वारकऱयांची पायी दिंडी दर दिवशी तीस किलोमीटर अंतर पार करीत असून विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला पोचणार आहे.
दिंडीतील वारकऱयांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पाऊस अqिधक होता. मात्र आता प्रमाण कमी आहे. वाटेत कोणतीही अडचण आलेली नाही. प्रत्येक गावात वारकऱयांचे जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने दिंडीला पोलीस संरक्षण दिले आहे. यामुळे कोणतीच भीती वाटत नाही. दिंडीच्या व्यवस्थापनाने चांगली सोय केली असल्याचे वारकऱयांनी सांगितले.
सत्तरीतून निघालेल्या दिंडीपैकी सत्तरी वारकरी मंडळ उस्ते सत्तरी व सातेरी केळबाय वारकरी मंडळ करमळी बुद्रुक या दोन दिंडींचाही समावेश आहे.