मुंबई
मारुती सुझुकी या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीने आपल्या ‘इको’ या गाडय़ा परत मागवल्या आहेत. हेडलॅम्पसंदर्भात समस्या आल्याने कंपनीने 40 हजारांहून अधिक इको गाडय़ा परत मागवल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. 4 नोव्हेंबर 2019 ते 25 फेब्रुवारी 2020 या कालावधीत निर्मिती केलेल्या इको गाडय़ांमध्ये दोष असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिलेले आहे. यासंदर्भात आपल्या विविध विपेत्यांच्या माध्यमातून दोषयुक्त गाडय़ा परत मागवण्याची मोहीम कंपनीने हाती घेतली आहे.