अनेक पीडीओंना 2-3 ग्रा.पं.चा कार्यभार सोपवल्याने समस्या : काही सेपेटरींनाही पीडीओंचा दिला अधिकार : सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठी समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
तालुक्मयात सध्या पीडीओंबाबत अनेक तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. पीडीओंची बदली करण्यासाठी काही राजकीय नेतेही पुढे सरसावतात. गावातील राजकारणाचा फटका मात्र पीडीओंना बसतो. पण, गावच्या राजकारणात विकास खुंटत जातो. बेळगाव तालुक्मयात सध्या 160 हून अधिक गावे असून केवळ 42 पीडीओंवर या गावातील कार्यभार अवलंबून आहे. दरम्यान, काही सेपेटरनींना पीडीओंचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे पीडीओंच्या तक्रारी वाढल्यानंतर अनेक ग्राम पंचायतींना पीडीओंविना कार्यभार रेटावा लागत आहे. यासाठी राज्य सरकारही टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व ग्राम पंचायतींवर पीडीओंची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्मयात केवळ 42 पीडीओ कार्यरत
तालुक्मयात 59 ग्राम पंचायती आहेत. मात्र, नुकताच यामधील दोन ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता 57 ग्राम पंचायती असल्या तरी अधिकृत सांगण्यात न आल्याने अजूनही त्या ग्राम पंचायतींचा कार्यभार पीडीओंकडेच आहे. यामुळे किमान 55 पीडीओंची तरी नितांत गरज आहे. तालुक्मयात केवळ 42 पीडीओ आहेत. त्यापैकी पाच सेपेटरींना पीडीओंचा कार्यभार स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. पीडीओंच्या कमतरतेमुळे अनेक भागातील विकास खुंटला आहे.
याबाबत अधिकाऱयांना विचारले असता सध्या बेळगाव तालुक्मयासह जिह्यातही हीच परिस्थिती असल्याचे सांगितले. आणखी पीडीओंची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला नसल्याचे सांगण्यात आले. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असून तालुक्मयातील पीडीओंच्या संख्येत वाढ होणार आहे. गावातील राजकारणामुळे अनेक पीडीओंच्या तक्रारी वाढत आहेत. काही गटातील नागरिकांना एक पीडीओ नको असतो तर काही गटातील नागरिकांना तोच पीडीओ हवा असतो. त्यामुळे त्यांच्यातील इर्षा पीडीओंच्या मुळावर येऊन बसते. या राजकारणात मात्र विकासावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. यामुळे वैयक्तिक राजकारण सोडून गावच्या विकासावर भर दिल्यास पीडीओंच्या बदल्याही काही प्रमाणात कमी होण्याची शक्मयता नाकारता येणार नाही.
पीडीओंवरील ताण कमी करा सध्या अनेक पीडीओंना दोन-तीन ग्राम पंचायती वाटून दिल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण अधिक पडला आहे. आठवडय़ातील काही दिवस एका ग्राम पंचायतीला तर दोन दिवस दुसऱया ग्राम पंचायतींना वेळ देणे गरजेचे असते. यामुळे एका ग्राम पंचायतमध्ये तोच पीडीओ कायमस्वरुपी राहू शकत नाही. नागरिकांच्या गैरसोयीमुळे काही नागरिक पीडीओंची बदली करा, अशी मागणी लावून धरतात. मात्र, संबंधित पीडीओंवर किती ग्राम पंचायतींचा कार्यभार असतो, याची दखल घेतली जात नाही. राजकारणामुळे काही जण तर आपल्या आमदारांकरवी किंवा लोकप्रतिनिधांकडून वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार करून त्या पीडीओंना निलंबित करण्यापर्यंतही मजल मारत असतात. यामुळे पीडीओंच्या बदलीला काही प्रमाणात का होईना राजकारणीच जबाबदार असतात. सध्या तालुक्मयात 42 पीडीओ व 5 सेपेटरीं कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे बदलीपेक्षा विकासावर अधिक भर दिल्यास चांगले होणार असल्याचे मतही अनेकांतून व्यक्त करण्यात येत आहे.