जुलैमध्ये लिलाव होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
5जी सेवेच्या संदर्भात सध्या मोबाईल कंपन्या उत्सुक असल्या तरी भारतामध्ये या सेवेसाठी थोडा उशीर लागणार असल्याची माहिती दूरसंचार विभागाकडून मिळाली आहे. भारतातील 5जी स्पेक्ट्रम लिलावाला उशीर होणार असल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) म्हटले आहे. किंमतीबाबतचा प्रस्ताव ट्रायने दूरसंचार विभागाला मार्चपर्यंत देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारी अधिकाऱयांच्या माहितीनुसार असे झाल्यास येत्या एप्रिल आणि मे मध्ये होणाऱया लिलावाला मात्र उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित मग 5जी संदर्भातील लिलाव हा जुलैमध्ये घोषित केला जाऊ शकतो अशी शक्मयता वर्तवली जात आहे.
दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांच्या मते स्पेक्ट्रम एकदा दिले गेले की त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी या क्षेत्रातील कंपन्यांना 5 जी सेवा लागू करता येते.