आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची माहिती
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांना मुख्य रस्त्यावरून जोडणारे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहेत. सदर जोड रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ग्रामीण अभिवृद्धी व पंचायत राजमधून 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
या 5 कोटीमधून मुंडवाड जोडरस्ता, नंजिनकोडल जोडरस्ता, चन्नेवाडी जोडरस्ता, बैलूर सिद्धनाथ मंदिर पिंपळवाडा जोडरस्ता, पूर-अळणावर तालुका हद्दीपर्यंत, दोड्डेबैल ते नंजिनकोडल रोड, किरहलशी जोडरस्ता, हिरेअंग्रेळी ते चिक्कअंग्रोळी-बीडी एमडीआर रस्ता, जटगे ते हलसाल रस्ता, कक्केरी ते चुंचवाड रस्ता, पडलवाडी जोडरस्ता, हंदीकोपवाडा (कणकुंबी) रोड, गोलीहळ्ळी ते होसेट्टी रोड या जोडरस्त्यांचा समावेश आहे. सदर निधीला मंजुरी मिळाली असली तरी पावसाळय़ानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
राज्यमार्ग-ग्रामीण मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी निधीची तरतूद
खानापूर तालुक्मयातून जवळपास सात राज्य महामार्गांचा प्रारंभ होतो. प्रारंभ झालेले सदर रस्ते तालुक्मयाच्या सरहद्दीपासून पुढे जातात. पण तालुक्मयात असलेल्या अनेक रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यमार्ग विकास निधी तसेच सार्वजनिक बांधकाम खातेअंतर्गत येणाऱया रस्त्यांच्या विकासासाठी अनुक्रमे 10 कोटी व 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अजूनही काही ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असून यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. मंजूर झालेली कामे पावसाळय़ानंतर हाती घेण्यात येणार आहेत.
-अंजली निंबाळकर, आमदार,खानापूर