ऑनलाईन टीम/तरुण भारत
Chandrapur News : चंद्रपुरात जिल्ह्यातील बल्लारपुरातील रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली आहे. या दुर्घटनेत प्रवासी पायी चालत असलेले १३ प्रवाशी जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा केली आहे. तसंच, जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेचा पादचारी स्लॅब कोसळल्याची घटना घडली. प्रवासी पायी चालत असलेले १३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्मवर भरपूर प्रवासी होते. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मृत महिलेच्या कटुंबीयांना ५ लाखाची मदत आणि जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.