नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱयांच्या लसीकरणानंतर आता सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च महिन्यापासून 50 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. देशात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कोरोना योद्धय़ांना लस देण्यात आली असून भारत सर्वात वेगाने लसीकरण मोहीम राबवणारा देश ठरला आहे.
भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 50 लाखाहून जास्त आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर ज्ये÷ नागरिकांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य दिले जाणार आहे. पुढील महिन्यात दुसऱया टप्प्याला प्रारंभ होणार असला तरी अद्याप त्याची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पहिल्या टप्प्यात एक कोटी सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन कोटी कोरोना योद्धय़ांना लस देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील दोन्ही भाग पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यातील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यामध्ये 50 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस देण्यात येईल. हा कार्यक्रम मार्च महिन्यात सुरू होईल. या टप्प्यात 27 कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.