50 hectares of agriculture lost in Sawantwadi taluk due to heavy rains
सावंतवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 40 ते 50 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे झालेल्या भात शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अशी माहिती अतिरिक्त तालुका कृषी अधिकारी श्री प्रमोद बनकर यांनी दिली श्री बनकर म्हणाले सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भात शेतीचे पंचनामे कृषी विभागांतर्गत गावागावात जाऊन करण्यात आले आणि अध्यापही पंचनामे सुरू आहेत सावंतवाडी तालुक्यात जवळपास 40 ते 50 हेक्टर भात शेती कापण्याजोगी आली असताना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात शेतीच्या नुकसानीचा पंचनामा अहवाल तयार करण्यात येत आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले कृषी विभागामार्फत गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसामुळे भात शेती गावागावात किती नुकसान झाले याचे पंचनामे कृषी सेवक सहाय्यकामार्फत करण्यात आले आहेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी