दर महिन्याला धान्यावर खर्च होतात 3 लाख, 60 किलो पीठ-30 किलो भाजीचा दररोज वापर
एका कुटुंबात अधिकाधिक किती लोक असू शकतात 10…20…50? राजस्थानात एका परिवारात 164 सदस्य आहेत. 50 खोल्यांच्या घरात 6 भाऊ स्वतःच्या कुटुंबासमवेत राहतात. या सर्व लोकांचे स्वयंपाकघर एकच असून पूर्ण परिवाराचे जेवण तेथेच तयार केले जाते. एक सामान्य माणूस वर्षभरात जितकी कमाई करतो, तितकी रक्कम केवळ एका महिन्यात या परिवारात धान्यावर खर्च होते.
नागौराच्या पांचौडी येथे राहणारे दुर्गाराम प्रजापतचा परिवार उदाहरण ठरला आहे. दुर्गारामचा 6 भावांचा परिवार आहे. परिवारात 6 भावांच्या पत्नीसह 30 मुलगे आणि त्यांच्या पत्नी, 15 मुली, 46 नातू, 26 नाती आणि 4 नातसुना आहेत. यातील 14 मुली आणि 2 नाती विवाहित आहेत.
परिवारात सर्वांचा स्वयंपाक एकत्रच तयार केला जातो. सर्व सदस्य घरात असल्यास एकावेळी 30 किलो भाजी तयार करावी लागते. दोन्ही वेळच्या जेवणासाठी 60 किलो पिठाचा वापर करत भाकऱया तयार केल्या जातात असे कैलाश प्रजापत यांनी सांगितले आहे.
17 महिलांकडून स्वयंपाक
परिवार मोठा असल्याने स्वयंपाक तयार करणे प्रचंड मोठे काम आहे. याकरता परिवाराने पूर्ण नियोजन करून ठेवले आहे. घरातील 17 महिलांकडे स्वयंपाकाची जबाबदारी आहे. त्यांच्यातही कामाची विभागणी झालेली आहे. अशाचप्रकारे भाजी तयार करण्याचे नियोजन असून यात काही महिलांकडे भाजी चिरण्याची तर काहींकडे भाजी तयार करण्याची जबाबदारी आहे.
85 गायी-म्हशी आणि बकऱया
परिवाराकडून 20 म्हशी, 15 गायी आणि 50 बकऱया पाळल्या जातात. त्यांच्यापासून मिळणाऱया दूधाचा बहुतांश हिस्सा परिवारातच वापरला जातो. या पाळीव प्राण्यांच्या देखरेखीची जबाबदारीही निश्चित आहे. पाण्यासाठी घरातच विवाह असून पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात आली आहे.
महिन्याला 8 सिलिंडर
मोठे परिवार असल्याने आकाराने मोठे असलेले स्वयंपाकघर तयार करवून घेण्यात आले आहे. याचनुसार भांडीही मोठय़ा आकाराची खरेदी करण्यात आली आहेत. चहा तयार करायचा असल्यास तो मोठय़ा पातेल्यात करावा लागतो. परिवाराकरता दर महिन्याला 8 सिलिंडर लागतात.
जगात याहून मोठा आनंद नाही
व्यक्तीचा आनंद परिवाराच्या आनंदापेक्षा वेगळा असू शकत नाही. मजबूत नात्यांचे बंधच परस्परांना सुख-दुःखाचे भागीदार करतात. परिवारातील प्रत्येक सदस्य स्वतःच्या शक्तीद्वारे मदत करून परिवारातील कामात हातभार लावत असल्याचे परिवार प्रमुख दुर्गाराम यांनी सांगितले आहे.