वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध हे परस्पर सन्मान, संयुक्त मूल्ये आणि वाढत्या भागीदारीला दर्शविणारे आहेत असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी काढले आहेत. दोन्ही देशांमधील राजनयिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
आम्ही आज (रविवारी) भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनयिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष करत आहोत. दोन्ही देशांदरम्यान विशेष रणनीतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी अणि त्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्यासोबत मिळून काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे-बोक यांनी भारतातील उच्च मूल्याच्या प्रकल्पांसाठी पुढील तीन वर्षांमध्ये 4 अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा केली होती.