आजच्या मतदानासाठी डिचोली तालुक्मयात यंत्रणा सज्ज. एकूण 82 मतदान केंदे
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींच्या 125 पंचसदस्यांचे भवितव्य ठरविण्यासाठी तालुक्मयातील 50824 मतदार सज्ज झालेले आहे. या 125 पंचसदस्य पदांसाठी एकूण 397 उमेदवार नशिब आजमावत आहेत. डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींमध्ये एकूण 82 मतदान केंदे सज्ज करण्यात आली आहेत. त्यावर 410 सरकारी कर्मचारी तैनात झालेले आहेत. आजच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा पूर्ण पणे सज्ज करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर व अपूर्वा कर्पे यांनी दिली.
तालुक्मयातील मये, डिचोली व साखळी या तीन मतदारसंघातील 17 पंचायतीत प्रचाराचा धडाका सुरु होता तो सोमवारी संपला. तरीही घरोघरी छुप्या भेटी सुरु आहेत. तालुक्मयात एकूण 22436 पुरुष 28388 महिला मतदार आहेत. अनेक महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे अनेक पंचायत विभागात महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे.
तालुक्मयातील आमदारांनी भाजप काँग्रेस नेत्यांनी आपल्या परीने फिल्डिंग लावलेली आहे. माजी आमदार व इतरही राजकीय नेते यांनी फिल्डिंग लावताना दिसत आहे. त्यामुळे रंगत वाढलेली आहे.
एकूण 82 मतदान केंद्रात प्रत्येकी पाच सरकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून एकूण 410 कर्मचारी आहेत, असे सांगण्यात आले. अनेक माजी सरपंच, पंचसदस्य, राजकीय नेते रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस वाढलेली आहे.
डिचोली मतदार संघात मुळगाव, अडवलपाल, मेणकुरे धुमासे, लाटंबार्से, साळ या पाच पंचायतीचा समावेश आहे. साखळी मतदार संघात सूर्ला, वेळगे, पाळी, आमोणा, न्हावेली, कुडणे पंचायतीचा समावेश आहे. तर मये मतदारसंघात मये, पिळगाव, नार्वे, वन मावळींगे कुडचिरे, कारापुर सर्वण, शिरगाव या पंचायतीचा समावेश आहे.
तालुक्मयात आतापर्यंत 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सदर प्रभागांमधील मतदारांना यावेळी मतदान करण्याची संधी मिळणार नाही. अनेक प्रभागांमध्ये थेट लढती होत आहेत. तर काही प्रभागांमध्ये तिरंगी लढती आहेत. तर काही प्रभागांमध्ये उमेदवरांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे. सर्व उमेदवारांनी आपापल्या परिने आपला प्रचार करून यंत्रणा लावली आहे. प्रमुख विरोधकाबरोबरच इतर उमेदवार किती मते काढतील आणि या मत विभागणीचा लाभ आपणास कसा होणार याकडे अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही पंचायतींमध्ये तर आतापासूनच पुढील मंडळ घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्या प्रभागात कोण पुढे आहे आणि कोणाला घेऊन पंचायत मंडळ स्थापन करता येईल यावरही चर्चा होऊ लागली आहे. आज होणाऱया मतदान आणि नंतरच्या निकालात सर्व काही स्पष्ट होणार असून त्यानंतर पंचायती खऱया कोणाच्या बाजूने राहतात हे पहावे लागणार.