रेशीमशास्त्र अभ्यासक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागातील रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका आणि पदविका या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग, चंद्रपूर अशा राज्यभरातील 54 शेतकऱयांनी ही ऑफलाईन परीक्षा दिली.
शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागात सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरिकल्चरची स्थापना 2017-18 मध्ये झाली. त्यावेळी सेंटरमध्ये रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका व पदविका अभ्यासक्रम सुरू केले. पहिल्या वर्षापासूनच या अभ्यासक्रमांना राज्यभरातील शेतकऱयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱयांनी प्रवेश घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमांसाठी दहा हजार रुपये शुल्क भरून शेतकरी प्रवेश घेतात आणि परीक्षाही देतात. यंदाही सिंधुदुर्गपासून ते चंद्रपूरपर्यंतचे शेतकरी प्रवेशित झाले आहे. सध्या पाऊस मोठय़ा प्रमाणात असूनही राज्याच्या विविध जिल्हय़ातील शेतकरी परीक्षेसाठी उपस्थित राहिले आहेत. या तरुण शेतकऱयांकडे रेशीमशेतीसाठी लागणारी अनेक कौशल्ये आहेत. शास्त्राrय कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड मिळाल्यास रेशीमशेतीमध्ये कोशांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविता येते. शास्त्राrय ज्ञान मिळाल्यामुळे शेतकऱयांचा रेशीम शेतीतील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या एकूण उत्पादनात आणि अर्थशास्त्रात मोठा बदल होतो. याच कारणांसाठी शेतकऱयांमध्ये हा अभ्यासक्रम लोकप्रिय झाला आहे. सहावी उत्तीर्ण शेतकरी आणि रेशीमशेतीतील तीन वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. या वर्षी 54 शेतकरी परीक्षा देत आहेत.
सर्व विद्यार्थी परीक्षा देतात हेच यश डॉ. ए.डी. जाधव (समन्वयक, रेशीमशास्त्र अभ्यासक्रम)
सर्व शेतकरी विद्यार्थी मोठय़ा उत्साहाने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहेत. शंभर टक्के विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली, हीच यशाची पोचपावती आहे. या अभ्यासक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांची उद्यमशीलता, व्यावसायिकता आणि स्वावलंबन हे गुणही शेतीतून सिद्ध करतात. या अभ्यासक्रमासाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.